कर्जमाफीचा लाभ नेमका कोणाला मिळणार, पहा कृषीमंत्री काय म्हनाले Datta Bharne on Farmer 

Datta Bharne on Farmer : सध्या अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट आणि शेतमालाच्या कोसळलेल्या बाजारभावांमुळे मोठ्या संकटात असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून मागणी असलेल्या कर्जमाफीच्या विषयावर कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, कर्जमाफीचा फायदा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता, राज्यातील सर्व गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना मिळेल, जे मोठ्या अपेक्षेने शासनाकडे पाहत आहेत.

Datta Bharne on Farmer ‘सर्व’ गरीब शेतकऱ्यांना दिलासा

कर्जमाफीचा लाभ नेमका कोणाला मिळणार, या प्रश्नावर बोलताना कृषीमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “या समितीच्या माध्यमातून राज्यातील जास्तीत जास्त नव्हे, तर सर्व गरीब शेतकऱ्यांना या योजनेचा निश्चितपणे लाभ मिळेल, अशा प्रकारे निर्णय घेतला जाईल,” असे ते म्हणाले. या घोषणेमुळे राज्यातील लाखो गरीब शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin November Installment लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार? मोठी अपडेट आली समोर!Ladki Bahin November Installment

३० जून २०२६ पर्यंत निर्णय

कर्जमाफी लागू करण्याची मागणी महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यात होती. तसेच, बच्चू कडू, महादेवराव जानकर, राजू शेट्टी यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांनी केलेल्या आंदोलनामुळे या मागणीला गती मिळाली. या संदर्भात नुकतीच मुख्यमंत्र्यांसोबत रात्री बैठक झाली.

या कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाची समिती स्थापन केली आहे. कृषीमंत्र्यांनी सांगितले की:

  • या समितीचा अहवाल येत्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सरकारला मिळेल.
  • या अहवालावर योग्य विचारविनिमय करून, ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफीच्या बाबतीत योग्य तो अंतिम निर्णय घेतला जाईल.

बँकांचे वर्षाअखेर जून महिन्यात असते, याच कारणामुळे ३० जून ही तारीख निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हे पण वाचा:
eGramswaraj  तुमच्या ग्रामपंचायतीचा सगळा भ्रष्टाचार बाहेर काढा… eGramswaraj

नुकसानीसाठी ३२ हजार कोटींचे पॅकेज

याव्यतिरिक्त, कृषीमंत्र्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवरही माहिती दिली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने यापूर्वीच ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजमधून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचनाम्यानंतर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

एकंदरीत, राज्यातील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय लवकरच घेतला जाईल आणि त्याचा लाभ सर्व गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी व्यक्त केला आहे.

हे पण वाचा:
Namo shetkari कधी येणार नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता… Namo shetkari 

Leave a Comment